टोमॅटो च्या वाढलेल्या भावांमुळे सामान्य नागरिकांना आर्थिक संकटात टाकलेले असतानाच, पुण्यातील ईश्वर गायकर ह्या शेतकऱ्याने टोमॅटोच्या उत्पनातून कमावले आहेत तब्बल ३ कोटी रुपये.
स्वयंपाकातील अतिशय महत्वाचा घटक असलेले टोमॅटो चे भाव गगनाला भिडलेले असतानाच पाचघर (ता. जुन्नर, जी. पुणे) गावातील शेतकरी ईश्वर गायकर ह्यांनी आपले टोमॅटोचे उत्पन्न विक्रमी भावाला विकून कोट्याधीश होण्याचे स्वप्न साकार केलेले आहे.
गायकर ह्यांनी दिलेल्या माहिती अनुसार त्यांनी त्यांच्या एकूण १८ एकर शेतातील १२ एकर शेतात टोमॅटो चे पीक घेतले होते. जून ११ पासून गायकर ह्यांनी तब्बल १८००० क्रेट चे उत्त्पन्न विकून तब्बल ३ कोटी रुपये कमावले आहेत. जून ११ ला त्यांच्या पिकाला ₹७७० दर क्रेट चा भाव मिळाला होता तसेच जुलै १८ दरम्यान त्यांच्या पिकाला तब्बल ₹२२०० दर क्रेट चा भाव मिळाला.
जयकर ह्यांनी त्यांचा मागील अनुभव सांगत असता, २०२१ साली त्यांना १५ ते १६ लाखाचे नुकसान झ्हाले होते. मागील वर्षी त्यांना फार कमी नफ्यावर माल विकायला लागला होता. अधिक माहिती अनुसार, यंदाच्या उन्हाळ्यात टोमॅटोच्या पिकावर वेगवेगळे आजार पसरल्या मुळे, बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांचं पीक कडून टाकलं.
जयकर ह्याच्या १५ वर्षाच्या अनुभवात, सध्या टोमॅटोला मिळालेला भाव हा सर्वाधिक असून अतापर्येंत टोमॅटो चा भाव हा ₹१५०० ते ₹१६०० दर क्रेट असायचा.